05/01/2021
कोणत्याही पुस्तकात वा युट्युब वरच्या व्हिडियोत न सांगितलेली टीप मी आज तुम्हाला देतो आहे, खास नववर्ष निमित्ताने. ही टीप माझ्या आगामी "यशस्वी होण्याचा प्रवास" पुस्तकातील आहे, जे लवकरच प्रकाशित होईल.
नववर्ष सुरू झाले की अनेक जण नवनवीन न्यू इयर resolution करत असतात. स्वतः साठी काही नवीन गोल्स/उद्दीस्थे ठरवत असतात. बहुतेकांचे उद्धिष्ट हे हेल्थ/तब्येत, वजन याच्याशी निगडित असतात.
तुम्ही तुमची उद्दीष्ठ कोणती ठरवलीत याहून महत्वाचे असते ती कशी ठरवलीत आणि कशी लिहिलीत.
तुमचे गोल्स कागदावर पेन/पेन्सिल घेऊन लिहून काढा. तुमचे गोल्स लिहिण्यासाठी मोबाईल अथवा कंप्युटर चा वापर करू नका.
आता तुम्ही विचाराल कम्प्युटर व मोबाईल च्या जमान्यात कागद-पेन कशा साठी वापरायचे? मोबाईल यावर इतके Apps आहेत गोल सेटिंग साठी त्या ऐवजी हे कागद पेन कशाला?
तर दोस्तहो, लिहिण्याचे खास असे फायदे आहेत, खास करून जेव्हा तूम्हाला तुमच्या मनाशी संवाद साधायचा असेल तर, जे कंप्युटवर वा मोबाईलवरील लिखाणात नाहीत. आणि कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण गोल सेटिंग हा अवचेतन मनाशी संवाद असतो, तो व्यवस्थित झाला तरच तुमचे गोल्स साध्य होतात अन्यथा नाही.
लिहिणे ही एक focused प्रक्रिया आहे. त्याची सर कम्प्युटर व मोबाईलला नाही.
कागदावर पेन/पेन्सिल घेऊन लिहितांना काय काय घडते बघूया:
१. आपल्याला आपली नजर, पेन्सिलचे टोक कागदावर जिथे टेकते तिथे एकाग्र करावी लागते.
२. आपली नजर, आपली बोटं व हात यांच्यात एकवाक्यता निर्माण करावी लागते, त्यांचे co-ordination साधावे लागते.
३. जे अक्षर अथवा शब्द लिहायचे आहे त्याचे आकार, चित्र मेंदूत शोधून तो पटलावर निर्माण करावा लागतो. आपल्या भावना ज्या मांडायच्या आहेत, अथवा जे लिहितो आहे त्याचा अनुभव मेंदूत निर्माण करावा लागतो, त्याचे चित्र निर्माण करावे लागते. उदा. तुम्ही समुद्र किनाऱ्याचे वर्णन लिहीत असाल तर आधी त्याचे चित्र व तिथला अनुभव तुम्हाला मेंदूत निर्माण करावा लागतो आणि मगच तुम्ही तो लिहू शकता.
४. लिहिताना तुम्ही दुसरा इतर विचार करू शकत नाही अथवा काम देखील करू शकत नाही. म्हणजेच डोक्यात एक विचार आणि कागदावर वेगळेच लिहिणे असे करता येत नाही. तसेच लिहीत असताना दुसरे काम करता येत नाही, त्यासाठी लिखाणात ब्रेक घ्यावा लागतो.
लिहिणे इतकी प्रचंड focused प्रक्रिया आहे (आणि अनेक पालकांना वाटते मुलं लिहीत का नाहीत किंवा अगदी लहान वयात क्षमता निर्माण झालेली नसतांना सुद्धा त्यांचा मुलांनी भरपूर लिहावे ). कम्प्युटर वा मोबाईल वर असे लिहिणे होत नाही कारण या दोन गोष्टीच मुळात distractive स्वरूपाचे मिडीयम आहेत.
कागदावर लिहीण्या इतके दुसरे focused व meditative काम नाही. याच साठी अनेक वेळेस आपल्याला गुरूने दिलेला मंत्र, त्याचा परिणाम हवा असेल तर, किमान 108 वेळा कागदावर लिहायला सांगितला जातो. कारण आपल्या लिहिण्याची कृती आपल्याला एकाग्र करते आपण जे लिहोतो आहोत त्यावर व जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याचे चित्र, त्याचा अनुभव आपल्या मनात तयार करतो, आपले।अवचेतन मन, आपण जे लिहोतो आहोत त्या विषयी अनुभव व चित्र तयार करते. आपले विचार थेट अवचेतन मनापर्यंत पोचतात. आणि हा अनुभव आपल्या अवचेतन मनाला कृती करण्यास उद्युक्त करतो, आपल्या उद्धिष्ट साध्य करण्याच्या प्रवासात अवचेतन मन आपली साथ द्यायला सुरुवात करते (law ऑफ attraction इथे काम सुरू करते) अवचेतन मनाची अफाट टाकत आपल्या मागे उभी राहते.
हे सर्व तुमचे उद्धिष्ट, तुमचें गोल्स कागदावर लिहिन्यानेच साध्य होते.
तेव्हा जर तुम्हाला तुमचे गोल्स साध्य करायचे असतील तर ते कागदावर, पेन/पेन्सिल घेऊन लिहून काढा.
या व अशा अनेक सोप्या क्लृप्त्या, ज्या तुमच्या अवचेतन मनाला जागृत करतील, त्याची शक्ती तुम्हाला देतील, व तुम्हाला यशस्वी बनवतील, मी माझ्या येणाऱ्या पुस्तकातुन तुमच्या समोर मांडतो आहे. पुस्तकाची किंमत किमान 500रु असेल, पण तुम्ही pre-book करू शकता आता केवळ 100रु भरून. तसे केल्यास, तुम्हाला माझे हे नवीन पुस्तक 40% सवलतीच्या दरात दिले जाईल.
Prebook करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून gpay करू शकता
https://gpay.app.goo.gl/pay-zy7CiEUuJMQ
29/12/2020
16/09/2020