Mahayoga

Mahayoga

Share

This is the page devoted to the teachings of Gurus of Shaktipat Tradition. Each class offers an opportunity to experience mindfulness in practice.

Maha Yoga is the vision of our ancestors to inspire a strong and healthy community of awareness by bringing people together to experience the authentic nature of yoga. You will be guided on an exploration and discovery of the intimate nature of the breath, body and mind, awakening to the essence of your being. Experience for yourself the transforming power of mahayoga and watch as your practice spills over into your life.

25/06/2022

तुका म्हणे कैंसें आंधळे ते जन ।
गेले विसरून खऱ्या देवा |

सर्वच जीव हे परब्रम्ह-परमात्मा किंवा भगवद्स्वरूप आहेत असे गुह्य तत्व भगवान श्री व्यास महर्षींनी सांगितले आहे.

हे तत्व विसरल्यामुळेच सर्व जन आंधळे झाले आहेत असे श्री तुकाराम महाराज म्हणतात.

आणि हाच आंधळेपणा जाऊन डोळसपणा येण्याकरिता जागृती येण्या करीता सद्गुरू सद्शिष्यावर शक्तिपात करतात.

ज्यायोगे शिष्य कृतार्थ होतो कृतकृत्य होतो. या जन्मात जे करावयाचे ते मी केले व जे मिळवावयाचे ते मी मिळवले अशी कृतार्थ भावना शिष्याच्या मनात उत्पन्न होते.

असे कृतार्थ होण्याकरिताच ईश्वराने जीवाला मनुष्य जन्म दिला आहे.

मनुष्य जन्माचे दुसरे काहीच ध्येय असूच शकत नाही. मनुष्याच्या या व पूर्वीच्या सर्व जन्मांच्या प्रयत्नांचे फळ हेच आहे. आणि जे केवळ आणि केवळ गुरुप्राप्तीने जीवाला प्राप्त होते.

05/08/2018
14/09/2017

It is safe to look within.

08/09/2017

. *आयुष्यभराची प्रतिष्ठा*

महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी
परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी
वाद घालण्यास सुरुवात केली.

गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म
यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने
तुम्ही कसे काय उभे राहिलात.?
कृष्णाने उत्तर दिले.

ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले.
*रुक्मिणीने विचारले..*
*कोणते पाप.?*
कृष्ण म्हणाला.
जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.
त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे.

*रुक्मिणीने विचारले.*
*मग कर्णाचे काय.?*
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात
कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.

पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला
व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.
तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण
अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर
त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.

*तात्पर्य :-*
तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!

*चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.*
*🙏🏻 श्रीकृष्णार्पणमस्तु 🙏🏻

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Pune