ShivarGani

ShivarGani

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ShivarGani, Sports, pune, Pune.

"गावगाड्यातला प्रत्येक माणुस हा चालतं बोलतं विद्यापीठच!"
"जिव्हाळा अन् आपुलकीनं भरलेल्या आपल्या माणसांना अन् त्यांच्या भावविश्वाला खर्‍या अर्थाने रेखाटावं हा खरा अट्टहास!"🌱

29/01/2026

शेतातली सेंद्रिय केळी!🌱

25/01/2026

🩷

01/01/2025

आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं... माझं चुकलं म्हणून हसत माघारी फिरण्यात मोठा आनंद वाटतो! कुणाशी वाद घालण्यात आता मजाच उरली नाही! पहिल्यासारखे आता भले हरले तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासन तास चर्चा करण्यात मजा वाटत नाही!
आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागे घेण्यात शहाणपणा वाटतो!
लोक आपल्याला चुकीचं समजतील याचे काहीच वाटत नाही!
चुक किंवा बरोबरच्या पलीकडे पण एक जग असतं तिथे फक्त शांतता असते!
अगोदर जग खूप वेगाने धावत आहे,वेगाने दुनिया पुढे चालली आहे,आपण या सगळ्यात मागे राहू याचं टेन्शन यायचं!
पण आता सावकाश चालणं योग्य वाटतं... कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येते!
आता पुढे चालणाऱ्या ला वाट करून द्यायची!
आपण कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं!
वाटेत सुख मिळेल दुःख मिळेल... हसायचं रडायचं आणि चालत राहायचं!🌱
#2025

नववर्षाभिनंदन!😊

28/09/2024

बकाल झालेलं पुणे.

स्मार्ट सीटीच स्वप्न दाखवत पुण्याला कधी दुर्दैवाच्या दशावताराच्या खाईत लोटल हे पुणेकरांना कळलं सुद्धा नाही. काल मुसळधार पाऊस पडला. काही कामानिमित्त पिंपरीला जायचं होत. चारच्या सुमारास बोपोडीच्या अलीकडे पोहचलो. खडकी रेल्वे स्टेशन ते बोपोडी हा अर्धा पाऊण किलोमीटरचा प्रवास करायला तब्बल पावणे तीन तास लागले. आता तिकडे जावून उपयोग नव्हता. म्हणून तसच सिग्नल ला डावी कडे वळलो अन औंध मार्गे घरी येऊ म्हणल.

तर औंध भाग इतका जॅम की दिड तास एकाच जागी. कसरत करत गणेशखिंड रोडला एक तासने पोहचलो. गणेशखिंड पासुन कोर्ट पर्यंत यायला दिड तास लागला. फारतर २० किलोमीटरचा प्रवास. पण तब्बल साडेसहा तास लागले.

खरच विचार करण्याची वेळ आलीये. हा सगळा भार शहराला सोसतोय का ? का केवळ मोजक्या लोकांच्या राजकीय महत्वकांक्षा शहराचा बळी घेतोय. त्यांना हवे ते लोकांच्या माथी मारल जातंय का ?

एस्कॉर्ट घेऊन बोंबलत फिरणाऱ्या लोकांना ह्या वेदना समजणार नाही. ह्या सहा सात तासात कित्येक लोकांची महत्त्वाची काम असतील. काहींना मेडिकल इमर्जन्सी असेल. कित्येक श्वास घुसमटले असतील ह्याच सोयरसुतक कोणाला नसते.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली बकाल झालेल्या पुण्यात सामान्य पुणेकरांना दुर्दैवाचे दशावतार ह्याची देही ह्याची डोळा पाहुन भोगण्या पलीकडे काही पर्याय नाही.

आलिया भोगासी. भोगा.


#पुणे #पुणेमनपा #पुणेशहर
#पुणेकर #पुणेट्रॅफिक

16/08/2024
09/08/2024

"गावगाड्यातली अस्सल कला!"

04/08/2024

जगणं विकणं आहे
कुणी स्वतःला कुणी ज्ञानाला कुणी बापजाद्याला कुणी हुंडा घेऊन तुंबडी भरून लग्न बाजाराला
जगण्याच्या पराकोटीच्या लढाईत जर सूरज चव्हाण उतरून खेळायचं ठरवत असेल तर काय बिघडलं ? त्याला माहितीय तो काळाय ,त्याला माहितीय तो बोबडा आहे ,त्याला हे नीट माहिती आहे कि तो व्यंगासोबत न्यूनगंडात जिंदगीची काही वर्षे घालवून कफ्फलक होऊन जगलाय . World is flat च्या जमान्यात जग एका प्रतलावर आलं . इंटरनेट ने कुणाचीच एकहाती मक्तेदारी मनोरंजनाच्या जगावर असू शकत नाही याची ग्वाही दिली . मनोरंजन किती उथळ किती दर्जेदार याचे निकष ठरवण्याच्या फुटपट्टीच्या मालकीचा पारंपरिक अधिकार कुणाजवळ राहिला ठेवला गेला ह्याचं ज्ञान आपल्याला आहेच .मनोरंजन रंजयते इति अशी काहीशी संस्कृत व्याख्या . आता कुणाला कशातून मिळत असेल ? स्ट्रगल ,हिरो होणं हे ख्वाब ह्या गावकुसातल्या पोरांनी कधी बघायचं ? बघायला शिकवलं इंटरनेट ने . बापा काका मामाच्या आयत्या फ्लॅट वर मुंबईत जाऊन सूरज चव्हाण ऑडिशन देत उपाशी पोटी डाएट करून जिम करून जगणार होता का ? जिंदगीच्या नशिबात मनी असून देखील जाता येणार न्हवतंच . त्याला काही केल्या त्याच्या भवतालला अर्थ द्यावा वाटत असणार . कुठल्या तरी भुरट्या नेत्याच्या मागं वर्ष बरबाद करण्यापेक्षा पण त्याला वाटलं छोटे व्हिडीओ करावेत . केले आवडले नावडले . संख्येच्या अल्गोरिदम च्या बाजारात व्हियूज च्या नंबरच्या खेळात स्वतःला सिद्ध केलं . कुणी कितीही नाकं मुरडूदेत पण त्याला हे हवंय ते करत रहाण्याची आणि मुख्य म्हणजे न्यूनगंडाला स्वतःचा आत्मविश्वास बनवण्याची जीवघेणी कसरत करत सिनेमात अभिनय करतोय अशी बातमी वाचली . एका रोल च्या पल्याड जाऊन मला तरी सूरज चव्हाण हा एका सिनेमाचा बायोपिक चा विषय वाटतो . न्यूनगंडाने ग्रासलेल्या शंभरातील नव्व्याणव लोकांचा ननायक .
खूप खूप अभिनंदन सूरज 😊
टीप : हि पोस्ट त्याच्या अभिनयाबद्दल नाही
-अक्षय इंडीकर ( लेखक ,दिगदर्शक )

23/07/2024

प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्नांचं रंगेबेरंगी झुंबर लटकत असतं.या स्वप्नांच्या गावचा प्रवास करताना आर्थिक शिदोरी सोबत लागते...यासाठी आज पैसा वाचवावा लागतो,तर येणाऱ्या काळात पैसा आपल्याला वाचवतो. यातूनच बचतीचा मार्ग पुढे येतो... याचाच एक प्रकार म्हणजे भिशी!

भिशी म्हणजे,एखाद्या ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करतात व ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात.साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. हा भिशी प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे.

भिशी हा काही ठराविक लोकांनी सुरू केलेला समुह असतो.जर एखाद्या भिशीच्या समुहामध्ये 20 सदस्य असतील तर सर्व सदस्यांकडून जमा केलेली रक्कम एका सदस्याला दिली जाते. तर काही वेळेस जमा केलेल्या रकमेचा लिलाव केला जातो. जो अधिक बोली लावतो त्याला ती भिशी दिली जाते. या प्रकारात भिशीच्या रकमेवर व्याज घेतले जाते. हा व्याजदर बाजारातल्या व्याजदरापेक्षा अधिक असतो. हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालतो.मध्यमवर्गीय किंवा लहान समुहातील भिशीमधून जमा होणारी रक्कम व्यापाऱ्यांच्या भिशीच्या तुलनेत खूपच कमी असते.

भिशी म्हणजे बिनव्याजी गुंतवणूक,भिशी म्हणजे बिनव्याजी कर्ज,भिशी म्हणजे सहकारी पद्धतीने एकमेकांना केलेली मदत,भिशी म्हणजे समूहाने केलेले नियम आणि ती पाळण्याची प्रत्येकाची जबाबदारी,भिशी म्हणजे बचत व भांडवल यांचे नियोजन होय!

भिशी प्रकारांमध्ये घरगुती भिशीचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. यात प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते.उदाहरणार्थ ग्रुपमध्ये 10 सदस्य आहेत,तर प्रत्येक सदस्याकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला 1 हजार रूपये गोळा केले जातात. जमा झालेले हे 10 हजार रूपये चिठ्ठ्या टाकून ज्या सदस्याचे चिठ्ठीत नाव येईल त्याला दिले जातात.ज्याचे नाव चिठ्ठीत येते त्याच्या नावाची चिठ्ठी पुन्हा बनवली जात नाही. पण त्याला प्रत्येक महिन्याला त्याचा 1 हजार रूपयांचा वाटा मात्र द्यावा लागतो. घरगुती भिशीप्रमाणे भिशीचे आणखीही काही वेगवेगळ्या पद्धती देखील आहेत.

🌱लकी ड्रॉ पद्धत -
या पद्धतीत भिशीद्वारे जमा झालेली एकत्रित रक्कम सभासदांच्या नावाच्या चिठ्ठ्या बनवून त्यातील एक चिठ्ठी लकी ड्रॉ प्रमाणे काढली जाते. चिठ्ठीत नाव असलेल्या सदस्याला ती रक्कम दिली जाते.

🌱लिलाव पद्धत-
सर्व सभादांकडून जमा झालेल्या एकूण रकमेचा लिलाव केला जातो. ज्याची बोली सर्वाधिक असते. त्याला ती रक्कम दिली जाते. बोली जितकी लावलेली असते, तेवढी रक्कम जमा झालेल्यातून वजा करून उरलेली रक्कम संबंधित व्यक्तीला दिली जाते. आणि वजा करून घेतलेली रक्कम नफा म्हणून इतर सदस्यांमध्ये वाटून घेतली जाते.

🌱पोट भिशी
हा प्रकार लिलाव पद्धतीप्रमाणेच असतो. फक्त यात वजा करून घेतलेली रक्कम इतर सदस्यांमध्ये वाटप करून न देता,ती एकाच सभासदाला वापरण्यासाठी दिली जाते.
🌱किटी पार्टी -
किटी पार्टी हे भिशीचेच इंग्रजी नाव आहे,असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.किटी पार्टीत भिशीप्रमाणेच ओळखीतले,नात्यातले किंवा शेजारी राहणारे लोक एकत्रित येऊन प्रत्येक महिन्याला काही पैसे जमा करतात आणि जमा झालेले पैसे एका सदस्याला देतात.
पण हा पैसे जमा करण्याचा आणि देण्याचा सोहळा पार पाडण्याबरोबरच लोकांच्या आग्रहानुसार यात वेगवेगळे खेळ आले.खाण्या-पिण्याच्या वस्तू आल्या, एकूणच या सोहळ्याला पार्टीचे स्वरूप येऊ लागले. कालांतराने यामधील पैसे जमा करण्याचा आणि देण्याचा भाग नगण्य ठरून त्यानिमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या पार्टीचीच चर्चा अधिक होऊ लागली आहे.

भिशी किंवा किटी पार्टी याच्यातील बचत आणि त्यातून इतरांना सहकार्य करणे हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. यामुळे आर्थिक बचतीची सवय तर लागतेच पण त्याचबरोबर सामूहिक सहकार्याने मोठे भांडवल उभे राहते. ज्यातून एखाद्याची आर्थिक गरज भागू शकते किंवा तो एखादा व्यवसाय उभा करू शकतो.

ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना भिशी हा मोठा आधार आहे. कारण या वर्गांना शासकीय बँका कर्ज देण्यासाठी जेव्हा तारण म्हणून काही मागतात त्यावेळी त्यांना ती गॅरंटी देता येत नाही.अशावेळी थोडा व्याजदर जास्त का असेना पण तात्काळ पैसे मिळवण्याचे साधन म्हणून या लोकांना भिशीचाच आधार मोलाचा ठरतो.

या भिशीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणावर गफलत किंवा फसवेगिरी झालेली सुद्धा पाहायला मिळते. काही सदस्य भिशी उचलून घेतल्यानंतर पुन्हा त्या गटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. यामुळे इतर सदस्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यासाठी सदस्याने भिशी लावताना आपल्या परिचयाच्या आणि खात्रीशीर लोकांच्या गटामध्येच लावली पाहिजे. यामुळे आपलीआर्थिक गुंतवणूक सुरक्षित राहून आपल्या स्वप्नांच्या गावचा प्रवास सोपा होण्यास मदत होते.
या भिशीला कोणताही शासकीय आधार नाही. बँक,पोस्ट,एलआयसी यांसारख्या यंत्रणामध्ये गुंतवलेल्या पैशांना खात्री असते त्याप्रमाणे भिशी सारख्या संकल्पनेला कोणतीही शासकीय गॅरंटी नसते.भिशी ही संकल्पना केवळ विश्वासावर चाललेला व्यवहार आहे.आपल्या आयुष्यभराची कमाई अशा व्यवहारात लावताना सर्व विश्वासहार्यतेचा साधक-बाधक विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे. विश्वासातून केलेले गुंतवणूक यशस्वी झाल्यास भिशीची मध्यमवर्गीय लोकांना, व्यापाऱ्यांना आपली प्रगती करण्यास मोठी मदत होते. -शिवारगाणी!🌱

21/07/2024

बीबट्या आणि मानव!🐆
सद्या मोठ्या प्रमाणावर बिबट्याचा मानवीवस्तीत वावर वाढला आहे!
येणाऱ्या काळात ही समस्या अजून गुंतागुंतीची होऊ शकते.देशात जेव्हढे वाघ आहेत त्यापेक्षा ८ पट जास्त बिबटे असण्याची शक्यता वर्तवली जाते...यावरून बिबट्याच्या संख्येचा अंदाज येतो.३ मे रोजी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस साजरा केला जातो.
बिबट्याच्या हल्ल्यात सगळ्यात जास्त बळी पडणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.जंगलाच्या शेजारी असणाऱ्या लोक वस्तीवर होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये सध्या बदल होऊन बिबटे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करताना देखील आपणास आज दिसून येते.घरातील कर्त्या पुरुषांवर झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे कित्येक कुटुंब उध्वस्त झाली आहेत.

मुळात बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी आहे..
महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात,यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे. मुळात बिबट्या हा अतिशय लाजाळू प्राणी आहे मनुष्य दिसल्यानंतर किंवा आवाज आल्यानंतर ते दूर पळून जातात.. आज हे बिबट्याचे दर्शन सहज सुलभपणे होत नाही.बिबटे एकांतात राहणे पसंत करतात,फक्त विनीच्या काळातच नर आणि मादी एकत्र दिसून येतात.मादी आपल्या पिल्लांची एक वर्षभर काळजी घेते. प्रत्येक गर्भधारणेदरम्यान, बिबट्याला दोन किंवा तीन शावक असतात. बाळंतपणानंतर माता त्यांच्या प्रदेशात भटकणे थांबवतात जोपर्यंत त्यांची मुले त्यांच्याबरोबर येण्यास सक्षम होत नाहीत तोपर्यंत.शावक सुमारे तीन महिने दूध पितात आणि त्यांना पहिल्या आठ आठवड्यांपर्यंत भक्षकांपासून वाचवण्यासाठी लपवून ठेवले जाते.बिबट्याचा गर्भधारणा कालावधी ९० ते १०५ दिवसांचा असतो. बिबट्याच्या पिल्लांना शावक म्हणतात.ही पिल्ले बंद डोळ्यांनी जन्माला येतात,जी पिल्ले जन्मानंतर चार ते नऊ दिवसांनी डोळे उघडतात.बिबट्याचे सरासरी आयुष्य १२ ते १७ वर्षांच्या दरम्यान असते.
दिवसा बिबट्याला झाडावर किंवा उबदार खडकावर आराम करायला आवडते. रात्री ते जागे असतात. त्यामुळे बिबट्या हा निशाचर प्राणी ठरतो.
बिबटे जंगलात खडकाळ गुहेसारख्या भागात राहतात.बिबटे बहुतांशवेळा हरीण,सांबर आणि रानडुकरांची शिकार करतात.
परंतु सध्या उजाड झालेली जंगलं,जंगलात वाढलेला मानवाचा हस्तक्षेप, बिबट्यांची मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली संख्या,अन्नसाखळीचा ढासळलेला समतोल यामुळे बिबट्या आज मानवावर सुद्धा हल्ला करतो.
चार पायाचा लहान प्राणी समजून बिबट्या प्रामुख्याने मानवाला लक्ष करतो. अचानक बिबट्या समोर दिसल्यानंतर त्याच्यापासून पळून न जाता हात वर करून शांतपणे उभा रहा व त्यातून हळूहळू मागे सरण्याचा प्रयत्न करा. बिबट्या एकदम मानवाच्या पुढे उभा असल्यास हात वर करून मोठ्याने ओरडून तेथून मागे सरकल्यास सुद्धा बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी होते.बिबट्याच्या हल्ल्याची निश्चित शाश्वती असल्यानंतर मानव झाडावर चढला असला तरीदेखील बिबट्या हल्ला करू शकतो.एखाद्या भागात बिबट्याचा वावर असल्यास त्या भागातील शेतकऱ्यांनी मानेच्या मागे मानवी मुखोटा लावल्यास बिबट्याची हल्ला करण्याची वृत्ती बदलू शकते.घराच्या समोर आग लावून ठेवल्यानंतर जंगली प्राण्यांचा हल्ला करण्याचा रोख त्या ठिकाणाहून दुसरीकडे वळला जातो.
बिबट्या हा मूळतः नरभक्षी नाही. खूप कमी वेळा तो मानवावर हल्ला करतो. परंतु ज्या बिबट्याने मानवावरती हल्ला केला आहे त्या बिबट्याला मानवी रक्ताची चव कळते.मानव आपल्या आहारात मिठाचे सेवन करत असल्यामुळे बिबट्याला इतर प्राण्यांपेक्षा मानवी रक्ताची चव जास्त वेगळी वाटते.पर्यायाने एकदा मानवावर हल्ला केलेला बिबट्या पुन्हा एकदा मनावर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.
बिबट्याचे वजन साधारणतः १०० ते १५० किलो असते.बिबट्यांच्या च्या हल्ल्यातून व्यक्ती वाचल्याच्या बातम्या देखील आपण वाचतो.या हल्ल्यातून वाचण्यासाठी खंबीर मानसिकता आणि तेवढेच शारीरिक सामर्थ्य देखील हवं.
बिबट्या हल्ला करताना लक्ष्याच्या मानेवरती प्रथमतः हल्ला करतो. त्याला घायाळ करून नंतर मान तोंडात पकडतो. बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी आपली मान वाचवल्यास बराच वेळा व्यक्ती जीवानिशी न जाता फक्त जखमी होऊ शकते,त्यासाठी शारीरिक सामर्थ्य असणं गरजेचं आहे.
उसाची वाढलेली शेती,उसामध्ये लपन्यासाठी मिळत असलेली जागा,तिथेच पिण्यास उपलब्ध असणारे पाणी(बिबट्या जास्त पाणी पीत नाही त्याची पाण्याची गरज त्याच्या अन्नातून जास्त भागते)या सर्व अनुकूल गोष्टी ऊस शेतीमध्ये बिबट्याचा वावर वाढण्यास देखील कारणीभूत आहेत.याच कारणामुळे बिबट्याची संख्या जंगलापासून मानवी वस्तीकडे जास्त वाढत आहे.
दिवसा बिबट्याला झाडावर किंवा उबदार खडकावर आराम करायला आवडते.रात्री ते जागे असतात.त्यामुळे बिबट्या हा निशाचर(रात्री जागणारा)प्राणी ठरतो. यामुळे शेतकऱ्यांनी रात्री जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

बिबट्याच्या किंबहुना तत्सम प्राण्यांच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे शासनाने देखील यासाठी विशेष योजना चालू केली आहे.वन्यप्राणी हल्ला अर्थसाह्य योजना-२०२४ चालू केली आहे.
1. वन्यप्राणी हल्ला अर्थसाह्य योजना २०२४ ही महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या माध्यमातून राबवली गेली आहे.

2. राज्यातील कोणत्याही नागरिकाचा वन्य प्राण्यांपासून हल्ला झाला असेल किंवा त्या हल्ल्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर २५ लाख रुपये त्या व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यात येतात, तसेच त्या व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास ०७ लाख ५० हजार रुपयांची रक्कम दिली जाते.
3. सदर वन्यप्राणी हल्ला अर्थसाह्य योजना २०२४ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही शासकीय कार्यालय फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही वन्यप्राणी हल्ला योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
4. लाभार्थी व्यक्तीला दिली जाणारी लाभाची रक्कम डी.बी.टी(Direct Bank Transfer)च्या सहाय्याने थेट अर्जदाराच्या बँकेच्या खात्यात जमा करण्यात येते.
5. राज्यामध्ये बहुतांश वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये शेतकरी जखमी होतात,तसेच जास्तीत जास्त वन्य प्राण्यांचे हल्ले हे शेतकऱ्यावरती होतात, त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासन आर्थिक मदत देते त्यामुळे या योजनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

यासोबतच योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील तत्वे पाळणे देखील गरजेचे आहे.

📍सदर वन्यप्राणी हल्ला अर्थसाह्य योजना २०२४ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे.

📍 अर्जदार व्यक्तीला आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवश्यकता आहे.

📍 अर्जदाराला आर्थिक मदत देण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर वन अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी करतील,त्यानंतर पंचनामा करून त्याचा लाभ दिला जाईल.

📍राज्यातील एखाद्या नागरिकांनी वन्य प्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने प्राण्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्यास,अशा परिस्थितीमध्ये वन्य प्राण्याने त्या नागरिकावर हल्ला केल्यास अशा परिस्थितीमध्ये आर्थिक सहाय्य दिले जात नाही.

📍 अर्जदार व्यक्तीने इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

बिबट्या हा वन्यजीव परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे.त्याचे परिसंस्थेमधील अस्तित्व कायम राहणे देखील अत्यंत गरजेचे आहे. बिबट्याच्या असण्यासोबतच आपण आपल्या जीविताची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
-शिवारगाणी!🌱

#बिबट्या #फॉरेस्ट

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune
Pune