06/09/2024
मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत...
निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात..
एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील...
व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील...
कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल...
हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल
.तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मनोसंतुलन...
WhatsApp Group Invite
21/07/2024
गुरुपौर्णिमेनिमित्त ज्ञानाच्या सागर रुपी श्री सद्गुरूंना कोटी कोटी प्रणाम..🙏🙏
04/02/2024
'दोष' नेमका कुणाचा?...
घरात अशांतता, आजारपण, आर्थिक तंगी व नात्यांमध्ये दगदग सुरू झाली की ग्रहदोष, वास्तुदोष पितृदोष सर्व 'आठवत' आपल्याला...
कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचे दोष मात्र आपल्याला का दिसत नसावेत?..
छे.. छे व्यक्तिमध्ये, कुटुंबामध्ये दोष...
कोण? आणि कसा शोधणार?
वास्तूमध्ये, ग्रहांमध्ये, कुंडली मध्ये दोष शोधून उपाययोजना केली की 'तात्पुरता' समाधान मिळवणारी आपण सर्व मंडळी खरंतर आपल्या स्वतःमधील व कुटुंबातील दोष सुद्धा 'शोधायला' शिकलं पाहिजे...
एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबातील दोष, उणीव किंवा कमतरता 'शोधणं' जेवढं महत्त्वाचं तेवढं त्याची 'जाणीव' होणं सुद्धा महत्त्वाचा ठरतं...
आणि जाणीव झाल्यानंतर त्याची कृतीमध्ये 'अंमलबजावणी' करायला लागल्यानंतर आपल्याला नको असलेले सर्व 'दोष' दूर जाऊन गरजेचा व आवश्यक असलेला बदल घडायला सुरुवात होत असते...
आपल्यातील कमतरता,अव्यवहारिक वागणं, बेभान प्रवृत्ती, चुकीच्या मनोकल्पना, नात्यांमधील मर्यादा ओलांडण्याचे वृत्ती , चुकीचे दृष्टिकोन, व्यसन, लैंगिक वासना, लोभ व द्वेष या दोषांपासून मुक्त होण्याचा 'संकल्प' केला की व्यक्तीमधील व राहत असलेल्या 'वास्तु' मधील पण दोष दूर नाही का होणार?
आणि होय निर्जीव 'वास्तु' मधील दोष शोधण्यापूर्वी आपण सर्वांनी स्वतःपासून आपल्यातील किंवा कुटुंबातील असलेल्या दोषाला मान्य केल्यास वास्तुदोष शोधण्याची गरजच भासणार नाही...👍
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता
मनोसंतुलन...
WhatsApp Group Invite
19/01/2024
निवांत झोपे करिता खूप-खूप शुभेच्छा...
निवांत झोप (peaceful sleep) ही आपण सर्वांना निसर्गाने दिलेली मोठी देणगीच आहे...विचार करा आपण 24 तास कार्यरत राहिलो असतो तर आपण 'माणूस' कमी व 'यंत्र' अधिक बनलो असतो...
आज धावपळीच्या जीवनशैलीमुळे, अधिकाधिक ताणतणामुळे, मोबाईल व इतर गॅजेट्समुळे किंवा आयुष्यातील गुंतागुंतीमुळे आपली झोप आपण हळूहळू गमावून बसत आहोत...
बऱ्याचदा यापैकी एखादे कारण नसतानाही बऱ्याच मानसशास्त्रीय आजारामुळे झोप न येण्याचे प्रकार घडत आहेत... लवकर झोप न लागणे, छान झोप न लागणे, एकदा झोपमोड झाल्यास परत झोप न लागणे, चांगली झोप न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी 'फ्रेश' न वाटणे, झोप पूर्ण न झाल्यामुळे उदास किंवा चिडचिडेपणा वाढणे, झोप न झाल्यामुळे कामात लक्ष देऊ न शकणे... सतत काही महिन्यापासून अशा तक्रारी असल्यास आपणास कमी झोपेचा मानसिक आजार (Insomnia) झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
याउलट झोपेचे अतिप्रमाण होत असल्यास किंवा अति प्रमाणात झोप येत असल्यास (Hypersomnia) नावाचा मानसशास्त्रीय आजार असण्याची शक्यता नाकारता येत नाही...
नैसर्गिक झोपमोड होण्या साठी शारीरिक (physical/biological) कारणे असल्यास त्यावर औषधोपचार उपलब्ध आहेत...पण कौटुंबिक, वैयक्तिक, व्यावसायिक व नातेसंबंधातील ताणतणामुळे झोपमोड झाल्यास त्याकडे 'दुर्लक्ष' करून चालणार नाही.. अगदी काही कालावधीसाठी काउन्सलिंग किंवा सायकोथेरपी ह्या 'विनाऔषधी' उपचार पद्धती आज उपलब्ध आहेत... नैसर्गिक झोपेमुळेच आपण शारीरिक व मानसिक स्तरावर 'निरोगी' राहू शकतो.. नैसर्गिक व निवांत किमान सात ते आठ तासांची झोप घेणे हा आधुनिक जीवनशैली करता नैसर्गिक 'मानसोपचार' आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही...त्यामुळे आपण सर्वांना निवांत झोपे करिता भरपूर शुभेच्छा...😊😊
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य बाबत माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता...
https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59
28/12/2023
Fight or Flight...choice is yours.....
ताण-तणावा ने वेढलेल्या मानवी आयुष्यात केव्हा, कुठे, कधी आणि कुठल्या स्वरूपात ताण-तणाव निर्माण होईल हे सांगता येत नाही....
आरोग्य, व्यवसाय, नातेसंबंध, कौटुंबिक वा व्यवसायीक अशा वेगळ्या पातळीवर आपण सर्वजण कमी-अधिक प्रमाणात ताणतणाव अनुभव करीत असतो...
त्यासोबतच आपल्याला असलेले ताण-तणाव आपण आपल्या परीने त्याचे योग्य समायोजनही (adjustment) करण्याचा सुद्धा प्रयत्न करीत असतो...
परंतु बऱ्याचदा आपले तान-तनाव जेव्हा आकस्मिक अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतात तेव्हा आपण घाबरून जातो किंबहुना गोंधळून जातो... आणि होय ही अतिशय सामान्य बाब आहे...
अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर मानसशास्त्रीय स्वरूपात दोनच पर्याय निर्माण होतात....पळ काढणे (flight) किंवा संघर्ष करणे (fight)...
निर्माण झालेले तान- तनाव संपवण्यासाठी आपले शरीर पळ काढण्यासाठी वारंवार खूप सूचना करीत असतो... तश्या प्रकारचे विविध हार्मोन्स सुद्धा आपल्या शरीरात निर्माण होत असतात... मानसिक पातळीवर बोलायचे झाल्यास निर्णयप्रक्रिया कमजोर पडलेली असते....अशा वेळेस आपण निवडलेल्या पर्यावरच पुढची दिशा ठरणार असेल तर योग्य निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते....
सिंह मागे लागल्यास समोरासमोर झुंज वा संघर्ष देणे हे शहाणपणाचे ठरणार नाही पण... पळ काढून प्रश्न सुटत नसतील तर झुंज देण्यासाठी सुद्धा... आपलेच शरीर आपल्याला मदत करायला तयार राहतो..... व त्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स एकवटून आपल्याला झुंज देण्यासाठी मदत करीत असतात...
पळ आणि संघर्ष या दोन्ही पर्यायासाठी...शरीर आणि मानसिक पातळीवर आवश्यक असणारे सर्व घटक आपल्या शरीरात व मानसिक प्रक्रियेत सर्वांमध्येच उपलब्ध असतात.....
या दोन्हीं पर्यायांपैकी एकच पर्याय निवडणे क्रमप्राप्त असल्यास आपला संघर्ष विरोधातून किंवा आक्रमकतेतुन निर्माण होणारा नसेल व तो बचावात्मक व नैसर्गिक संघर्ष असल्यास अधिक उपयुक्त व दीर्घकालीन स्वरूपाचा ठरेल.... अशा ताण-तणावाच्या परिस्थितीमध्ये वैयक्तिकरीत्या मला संघर्ष (fight) करायला आवडेल....
Let me know your choice ......
©️ डॉ. जितेंद्र गांधी
पोस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात...
24/12/2023
अपेक्षांचे मानसशास्त्रीय नाट्य.....
मानवी अपेक्षांचे 'ओझं' खरं तर न संपणार असतं...
म्हणून ते वाढवत राहायचं की टप्प्याटप्प्याने कमी करत राहायचं याचा 'निर्णय' प्रत्येकाने घ्यायला हवा...
अपेक्षांचे ओझं कमी करण्याचा फक्त निर्णय घेऊन चालणार नाही तर 'अपेक्षाविरहित' कृती सुद्धा निर्माण करावी लागेल...
अपेक्षांचे ओझं मनातून व कृतीतून जसं जसं कमी होईल तसं तसं मानसिक स्तरावर 'हलकं' वाटायला लागेल....
आणि आपल्याला मानसिक स्तरावर "आतून" हलकं वाटायला लागायला लागलं की समजायचं अपेक्षांचे ओझं कमी होत असेल...
अपेक्षांचा नाट्य येथे संपत नाही पहिल्या भागात अपेक्षांचे ओझं कमी झालं की..... दुसऱ्या भागात आपल्या अपेक्षां दुसऱ्याला ओझं तर निर्माण करत नाही करीत ना? याची सुद्धा 'लिटमस' टेस्ट करीत राहणे गरजेची असते...
अन्यथा आपण आपल्या अपेक्षांचा ओझं कमी करण्यात 'यशस्वी' होऊ पण आपल्या अपेक्षा दुसऱ्यांना ओझं निर्माण करायला लागल्या तर दुसऱ्यांनाही 'गुदमरल्यासारखं' होईल जसं तुम्हाला होत होतं...
मानवी आयुष्यात आशा अपेक्षांच मानसिक नाट्य आयुष्यभर संपणार नसलं तरी त्यामधून फक्त आणि फक्त "मानसशास्त्रीय दुखणं" निर्माण होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचं आहे...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
पोस्ट आवडल्यास प्रतिक्रिया देऊन इतरांनाही शेअर करावी...👍👍
21/05/2023
माझ्याकडील संपूर्ण मानसिक आरोग्य संदर्भातील माहिती यूट्यूब चैनल वर अपलोड केलेली आहे व करीत राहील... आपण सर्वांना ही माहिती मानसिक आरोग्य संवर्धनासाठी निश्चितच मदत करेल अशी आशा आहे... सर्वांनी भेट देऊन अभिप्राय कळवावा ही विनंती...
https://youtube.com/.jitendragandhi4159
27/03/2023
जागतिक मानसिक आरोग्याने जगातील व एकंदरीत भारतीयांचे घटते मानसिक आरोग्य या संदर्भात चिंता व्यक्त केली असून मानसशास्त्रीय स्तरावर प्रतिबंधात्मक पातळीवर हा लेख आपणास उपयोगी पडू शकतो... आवडल्यास इतरांना फॉरवर्ड करावे...
स्वच्छता मनाच्या स्टोअर्सची.....
आपल्या मनाला (मेंदूला ) दोन प्रकारचे स्टोअर्स (भंडार) असतात पहिले म्हणजे बोधात्मक मन (conscious mind) व दुसरे म्हणजे अबोध मन (un...